जया एकादशी 2022 - Jaya Ekadashi 2022 In Marathi

दरवर्षी शुक्ल पक्षातील माघ महिन्यात जया एकादशीचे व्रत केले जाते. या वर्षी शनिवार, 12 फरवरी, 2022 रोजी व्रत केला जाणार आहे. हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे लोक असा विश्वास करतात की, या दिवशी निर्धारित परंपरा आणि विधींचे काटेकोरपणे पालन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांना दिव्य लाभ देतात. या सोबतच, हे व्रत निष्ठेने पाळल्यास माता लक्ष्मी ची कृपा ही प्राप्त होते. या शिवाय जया एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील कष्ट आणि दुःख ही दूर होतात.


जया एकादशी हा सनातन धर्मात अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. जया एकादशीला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी म्हणतात. वर्षभरात सुमारे 24 ते 26 एकादशी तिथी असतात, त्या प्रत्येकाचे स्वतःचे महत्त्व असते, ज्यामध्ये जया एकादशीचा समावेश होतो. ही एकादशी अत्यंत पुण्य कार्य मानली जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास केल्याने भूत, पिशाच, यांसारख्या रूपांपासून मुक्ती मिळते. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचा नियम सांगितला आहे. दक्षिण भारतातील काही हिंदू पंथांमध्ये, विशेषत: कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांमध्ये, जया एकादशीला 'भूमी एकादशी' आणि 'भीष्म एकादशी' म्हणून ही ओळखले जाते.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

जया एकादशीचे महत्त्व 'पद्म पुराण' आणि 'भविष्योत्तर पुराण' या दोन्हीमध्ये सांगितले आहे. युधिष्ठिराला या दिवसाचे महत्त्व सांगताना स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, या दिवशी व्रत केल्याने ब्रह्म हत्यासारख्या पापांपासून ही मुक्ती मिळते. माघ महिना भगवान शिवाच्या भक्तीसाठी शुभ आहे म्हणून, जया एकादशी भगवान शिव आणि विष्णू उपासकांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

जया एकादशी व्रत 2022: वेळ आणि तारीख

12 फेब्रुवारी, 2022 (शनिवार)

एकादशी शनिवार, फेब्रुवारी 11, 2022: 13:54 पासून

एकादशी रविवार, 12 फेब्रुवारी, 2022 ला 16:29:57 वाजेपर्यंत समाप्त होत आहे.

जया एकादशी व्रत मुहूर्त

जया एकादशी पारणा मुहूर्त: 07:01:38 पासून 09:15:13 पर्यंत 13, फेब्रुवारी ला

अवधी: 2 तास 13 मिनिटे

माहिती: वरील दिलेले पारण मुहूर्त फक्त नवीन दिल्लीसाठी मान्य आहे. जर तुम्ही आपल्या शहराच्या अनुसार या दिवशीचा पारणा मुहूर्त जाणून घ्यायचा असेल तर, येथे क्लिक करा

जया एकादशी पूजन विधी

हिंदू धर्मात माघ महिन्याला पवित्र महिना म्हटले जाते म्हणून, या पूर्ण महिन्यात उपवास आणि शुद्धीकरणाला अधिक महत्व मानले गेले आहे. या महिन्याच्या शुक्ल पक्षाला ‘जया एकादशी’ साजरी केली जाते. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची भक्ति भावाने पूजा केली जाते.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

जया एकादशी ची व्रत कथा

जया एकादशीची ही कथा भगवान श्री कृष्णानेच युधिष्ठिराला सांगितली होती. या आख्यायिकेनुसार, एकेकाळी नंदनवनात सण साजरा केला जात होता. या उत्सवात सर्व देवी-देवता, सिद्ध संत, दिव्य पुरुष सहभागी झाले होते. या वेळी गंधर्व गात होते आणि त्या वेळी गंधर्व मुली नाचत होत्या. या उत्सवात मल्यवान नावाचा गंधर्व मुलगा आणि पुष्पावती नावाची गंधर्व मुलगी देखील उपस्थित होती. मल्यवान दिसायला अतिशय सुंदर होता तसेच गंधर्वांची गाणी ही मोठ्या सौंदर्याने गात होता. त्याच वेळी गंधर्व मुलींमधील पुष्पावतीचे सौंदर्य ही पाहण्यासारखे होते.

एकमेकांना पाहिल्यानंतर दोघे ही एकमेकांमध्ये अशा प्रकारे हरवून गेले की दोघांची ही लय हरवली ज्यामुळे भगवान इंद्र संतप्त झाले. तेव्हा भगवान इंद्राने मल्यवान आणि पुष्पावती यांना स्वर्गापासून वंचित राहावे आणि त्यांचे पुढील जीवन नरकात घालवावे असा शाप दिला.

एवढ्या मोठ्या संमेलनात पुष्पावती आणि मल्यवान यांचे अनैतिक वर्तन पाहून भगवान इंद्र इतके क्रोधित झाले की त्यांनी विचार न करता त्या दोघांना ही शाप दिला की, 'त्या दोघांनी स्वर्गापासून वंचित राहावे आणि पृथ्वीवर जाऊन त्यांचे पुढील जीवन जगावे.' या वरून भगवान इंद्र ही म्हणाले, 'आता तुम्ही दोघेही पिशाच योनीमध्ये भावी जीवन व्यतीत कराल.' परिणामी दोघे ही पिशाच बनले आणि दोघे ही हिमालयाच्या शिखरावर असलेल्या झाडाखाली राहू लागले.

पिशाच योनीत त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला. एके काळी माघ शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी दोघे ही दुःखी होते. त्या दिवशी त्यांना फक्त फळे खायला मिळाली. रात्रभर त्यांना खूप थंडी जाणवली म्हणून, ते रात्रभर सोबत बसले. या नंतर दोघे ही थंडीने मरण पावले आणि जया एकादशीच्या अनपेक्षित उपवासामुळे दोघे ही पिशाच योनीच्या शापातून मुक्त झाले. आता दोघे ही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आणि त्यांना स्वर्गात स्थान देण्यात आले.

त्यांना स्वर्गात परत पाहून देवराज इंद्राला खूप आश्चर्य वाटले आणि विचारले की तुम्ही दोघांनी पिशाच योनीतून स्वतःला कसे मुक्त केले? तेव्हा मल्यवनाने त्याला सांगितले की, हे भगवान विष्णूच्या जया एकादशीचे फळ आहे. या एकादशीमुळे आपल्याला पिशाच योनीपासून मुक्ती मिळाली आहे. हे ऐकून इंद्रदेव आणि देवता प्रसन्न झाले आणि म्हणाले की, तू भगवान जगदीश्वरांचा भक्त असल्यामुळे तुला माझ्याकडून सन्मान मिळेल आणि तू स्वर्गात सुखाने राहू शकशील.

जेव्हा भगवान श्री कृष्णांनी ही कथा ऐकली तेव्हा ते म्हणाले की जया एकादशीच्या दिवशी आपण जगदीश भगवान विष्णूची पूजा केली पाहिजे. एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांनी दशमीच्या दिवशी एकदाच भोजन करावे. या काळात तुम्ही फक्त सात्विक आहार घ्यावा. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे ध्यान करून त्यांची पूजा करावी. पूजेमध्ये धूप, दिवा, चंदन, फळे, तीळ आणि पंचामृत यांचा समावेश करून व्रताचे व्रत करावे.

हिंदू पौराणिक कथेनुसार, जया एकादशीच्या दिवशी मनापासून शत्रुत्व दूर ठेवून भगवान विष्णूची मनापासून पूजा करावी. या दिवशी कोणी ही वाईट, अप्रामाणिकपणे वागू नये किंवा कोणाचा ही वाईट विचार करू नये. या दरम्यान नारायण स्तोत्र आणि विष्णु सहस्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ सिद्ध होते. हे व्रत पूर्ण भक्ती भावाने पाळणाऱ्यांना लक्ष्मी आणि विष्णूची कृपा आयुष्यभर राहते.

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

जया एकादशीच्या दिवशी काळजी घेण्याच्या गोष्टी: काय करावे आणि काय करू नये

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

जया एकादशीच्या दिवशी राशी अनुसार हे उपाय देतील भगवान विष्णु ची कृपा

जया एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर, आचार्य हरिहरन यांच्याकडून जाणून घेऊया, या दिवशी करावयाचे काही अतिशय सोपे ज्योतिषीय उपाय, ज्याचा अवलंब करून तुम्ही ही या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या जीवनात प्राप्त करू शकतात.

मेष राशि

वृषभ राशि

मिथुन राशि

कर्क राशि

सिंह राशि

कन्या राशि

तुळ राशि

वृश्चिक राशि

धनु राशि

मकर राशि

कुंभ राशि

मीन राशि

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer