जन्माष्टमी 2022 - Janmashtami 2022 In Marathi

Author: योगिता पलोड | Updated Thu, 18 August 2022 04:56 PM IST

जन्माष्टमी हा हिंदूंचा सर्वात प्रसिद्ध आणि प्रमुख सण आहे जो भारता सोबतच जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण भगवान श्री हरी विष्णूचा आठवा अवतार, जगाचा रक्षक भगवान कृष्ण यांना समर्पित आहे. जन्माष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून ही ओळखला जातो. या सणाच्या दिवशी सर्वांचा लाडका कान्हा यांचे आशीर्वाद मिळणे उत्तम मानले जाते. अ‍ॅस्ट्रोसेज च्या या ब्लॉगद्वारे आम्ही तुम्हाला जन्माष्टमी 2022 बद्दल सर्व माहिती देऊ तसेच, यावर्षी जन्माष्टमीला घडलेल्या शुभ संयोगांबद्दल ही तुम्हाला सांगू, चला तर मग, या सणाबद्दल विलंब न लावता जाणून घेऊया.


पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. साधारणपणे, हा सण ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. या दिवशी रोहिणी नक्षत्रात कृष्णाचा जन्म झाला. अनेक ठिकाणी जन्माष्टमीला गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी, कन्हैया अष्टमी, कन्हैया आठवी, श्रीजी जयंती आणि श्रीकृष्ण जयंती म्हणून ओळखले जाते. जगातून पाप आणि अत्याचार दूर करण्यासाठी मध्यरात्री भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

जन्माष्टमी 2022 तिथी आणि पूजा मुहूर्त

19 ऑगस्ट 2022, शुक्रवार

जन्माष्टमी मुहूर्त

निशीथकाल पूजा मुहूर्त: 24:03:00 पासून 24:46:42 पर्यंत

अवधि: 43 मिनट

जन्माष्टमी पारणा मुहूर्त: 05:52:03 च्या पश्चात (20 ऑगस्ट)

जन्माष्टमीला बनत आहेत हे विशेष संयोग

हिंदू कॅलेंडरनुसार, 2022 जन्माष्टमी हे वर्ष अनेक अर्थांनी खूप खास असणार आहे कारण, या सणावर वृद्धी योग आणि ध्रुव योग तयार होत आहेत. हे दोन्ही योग भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानले जातात. जन्माष्टमीच्या दिवशी तयार झालेल्या वृद्धी योगात कोणते ही कार्य केल्यास त्या कार्यात यश प्राप्त होते.

वृद्धि योग का प्रारंभ: 17 ऑगस्ट 2022 ला रात्री 08.56 वाजेपासून,

वृद्धि योग की समाप्ती:18 ऑगस्ट 2022 ला रात्री 08.41 वाजता.

धुव्र योग का प्रारंभ: 18 ऑगस्ट 2022 ला रात्री 08.41 वाजेपासून,

धुव्र योग की समाप्ती: 19 ऑगस्ट 2022 ला रात्री 08.59 वाजेपर्यंत.

लग्नाधी योग :- या योगात सूर्य स्वतःच्या राशीत संक्रमण करत आहे, हा खूप चांगला योग आहे कारण, सूर्य हा चारित्र्य आणि आत्मा यांचा कारक आहे आणि सूर्य सरकारी नोकऱ्या आणि सरकारी कामांचे प्रतिनिधित्व करतो. अशा स्थितीत या दिवशी प्रत्येकाला तांब्याच्या भांड्यात लाल रोळी टाकून सूर्याला जल अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

जन्माष्टमी महत्व

दुष्ट कंसाच्या अत्याचारापासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण यांनी द्वापार युगात पृथ्वीवर जन्म घेतला. मान्यतेनुसार जन्माष्टमीच्या दिवशी लड्डू गोपाळाची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी मध्यरात्री बाल गोपाळांची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीकृष्ण जन्माच्या आनंदात भाविकांकडून घरे आणि मंदिरांची विशेष सजावट केली जाते.

जन्माष्टमीच्या दिवशी, भक्त दिवसभर उपवास करतात, बाल गोपाळांना पंचामृताने अभिषेक करतात आणि त्यांच्या कन्हैयाचे आशीर्वाद घेण्यासाठी रात्रभर मंगल गीते गातात. या दिवशी श्रीकृष्णाची उपासना केल्याने दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि संतती प्राप्त होते. विशेषत: जन्माष्टमीला गाईची सेवा आणि पूजा करावी, असे केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात.

जन्माष्टमी व्रत पूजा विधी

आपल्या लाडक्या श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्त जन्माष्टमीचा कडक उपवास करतात. श्रद्धेने केले जाणारे व्रत यशस्वी होण्यासाठी जन्माष्टमी व्रताचे पूजन पुढीलप्रमाणे विधिपूर्वक पद्धतीने करावे.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

जन्माष्टमी दिवशी करा या मंत्रांचा जप

।। ॐ नमो भगवते श्री गोविन्दाय नमः।।

ॐ नमो भगवते तस्मै कृष्णाया कुण्ठमेधसे,

सर्वव्याधि विनाशाय प्रभो माममृतं कृधिराम

(हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ( या दिवशी या मंत्राच्या 16 माळा जप केला पाहिजे.)

जन्माष्टमी दिवशी केले जाणारे धार्मिक अनुष्ठान

मथुरा-बरसाने ची जन्माष्टमी: भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरा-वृंदावनमध्ये जन्माष्टमीला एक वेगळ्याच प्रकारची रोनक पहायला मिळते. या दिवशी प्रामुख्याने रासलीला आणि श्रीकृष्ण लीला येथे रंगतात.

दही हंडी महोत्सव: प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दही आणि हंडी म्हणजे मटकी, मातीची भांडी. दहीहंडी मागे अशी श्रद्धा आहे की, लहानपणी भगवान श्रीकृष्ण गोपाळांसोबत घरोघरी जात आणि दूध, दही, लोणी साठी मटकी फोडायचे. तेव्हापासून दही-हंडी उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

जन्माष्टमीच्या दिवशी चुकून ही करू नका ही कामे

या दिवशी भोजनात अन्नाचा वापर न करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, एकादशीच्या उपवासात जे अन्न तुम्ही सेवन करता, तेच अन्न जन्माष्टमीला भोग लावून करायचे आहे.

  1. जन्माष्टमी तिथीला कोणत्या ही व्यक्तीचा अपमान करू नका, सर्वांशी नम्रतेने व प्रेमाने वागावे.

  2. वैदिक मान्यतेनुसार, जन्माष्टमी व्रताच्या वेळी, श्रीकृष्णाच्या जन्मापर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत व्रत पाळताना अन्न खाणे टाळावे.

  3. जन्माष्टमीच्या निमित्ताने ब्रह्मचर्य पाळावे.

  4. या दिवशी कोणाला ही अन्न दान न करण्याचा प्रयत्न करा.

योग

जयंती योग: तुम्हाला हे देखील माहित आहे की, भगवान श्रीकृष्णाची वृषभ राशी आहे आणि रोहिणी नक्षत्र आहे, त्यामुळे यावेळी देखील तेच योगायोग घडत आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाचा योग आहे, त्यामुळे या योगात जन्मलेल्या मुलांमध्ये भगवान श्रीकृष्णासारखे गुण असतील, असे धर्मग्रंथांमध्ये मानले जाते. अशी मुले समाजात प्रतिष्ठित होतील, नवीन आदर्श ठेवतील आणि अनेकांमध्ये अनेक असतील. उर्वरित लोकांना देखील या दिवशी उपवास करण्याचा सल्ला दिला जातो.

जन्माष्टमी निमित्त केले जाणारे अचूक उपाय

भगवान श्रीकृष्ण हे संमोहन आणि आकर्षणाचे महान देवता असल्याने जन्माष्टमीची रात्र मोहरात्री मानली जाते. धर्मग्रंथानुसार, भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार मानला जातो आणि त्यांची पत्नी ही माता लक्ष्मीचे रूप मानली जाते, त्यामुळे या दिवशी असे काही निश्चित उपाय केले जातात, जेणेकरून देवी लक्ष्मीला लाभ मिळेल. तिच्या भक्तांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील ते नक्कीच आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. चला त्या उपायांबद्दल जाणून घेऊया:

1. आंघोळीनंतर भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी, यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.

2. भगवान श्रीकृष्णांना पितांबर धरी असे ही म्हटले जात होते, त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी पिवळे फळ, पिवळे कपडे, पिवळी फुले आणि पिवळ्या मिठाई भगवान श्रीकृष्णाला अर्पण कराव्यात. असे केल्याने तुम्हाला कधी ही पैसा आणि प्रसिद्धीची कमतरता भासणार नाही.

3. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला साबुदाणा, पांढरी मिठाई आणि खीर अर्पण करा. खीरमध्ये साखर घालण्याऐवजी ताल मिश्री चा वापर केल्यास चांगले होईल आणि खीर थंड झाल्यावर देवाला तुळशीची पाने अर्पण करावीत. यामुळे तुम्हाला पैशांची आणि ऐश्वर्याची कधी ही कमतरता भासणार नाही.

४. प्रेम जीवनात यशस्वी होण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाला पिवळ्या माळा अर्पण करा, खव्याची पांढरी मिठाई, मध आणि ताल मिश्री अर्पण करा आणि भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करा की तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात यशस्वी व्हा.

5. सर्व गोष्टींमध्ये देवाचा आवडता माखन मिश्री आहे म्हणून, जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाला अर्पण म्हणून माखन मिश्री करा.

6. जन्माष्टमीच्या दिवशी 12:00 वाजता, श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी, आपण दुधात केशर आणि तुळशीची पाने टाकून भगवान कृष्णाला अभिषेक करावा, जेणेकरून आई लक्ष्मी कधी ही घराबाहेर पडणार नाही आणि आपल्या घरावर नेहमी आशीर्वाद देईल.

7. प्रेम विवाह करू इच्छिणाऱ्या प्रेमी युगुलांनी या दिवशी भगवान श्री कृष्णाला पाण्यासोबत नारळ आणि केळी अर्पण करावीत आणि आपल्या प्रेयसी सोबतआपले लग्न व्हावे अशी त्यांच्या मनात प्रार्थना करावी आणि या मंत्राचा ही जप करावा. (ॐ क्लीम कृष्णाय गोविंदाऐ वासुदेवाय गोपीजन वल्लभाये) या पद्धतीने तुम्हाला तुमचे प्रेम नक्कीच मिळेल.

8. जन्माष्टमीच्या दिवसापासून तुम्ही 27 दिवस सतत श्रीकृष्णाला खोबरेल तेल आणि 11 बदाम आणि तुळशीची पाने अर्पण केल्यास तुमचे सर्व कार्य कोणत्या ही अडचणीशिवाय पूर्ण होतील.

राशी अनुसार भगवान कृष्णाला अर्पित करा या वस्तू:

1. मेष राशीच्या लोकांनी देवाला लाल फुल अर्पण करावे आणि लाल वस्त्र परिधान करावे.

2. वृषभ राशीच्या लोकांनी भगवंताला खवा पेडा आणि पांढरे (दुधाळ) रंगाचे वस्त्र परिधान करावे.

3. मिथुन राशीच्या लोकांनी देवाला पिवळी फुले, पिवळी मिठाई आणि पिवळे वस्त्र अर्पण करावे आणि माखन मिश्री ही अर्पण करावी. त्यामध्ये तुळशीच्या पानांचा अवश्य समावेश करा.

4. कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान श्रीकृष्णाला सुक्या धन्याचा प्रसाद अवश्य द्यावा. यामुळे त्यांच्या घरात समृद्धी येते.

5. सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान श्रीकृष्णाला सुका मेवा अर्पण करावा. यामुळे त्यांना नवीन ग्रह शांतीचा फायदा होईल.

6. कन्या राशीच्या राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला कमलगट्टे हार अर्पण करून गुलाबी वस्त्रे अर्पण करावीत.

7. तुळ राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला पान अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल.

8. वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला लाकडी बासरी अर्पण करावी. त्यामुळे त्यांची सर्व बिघडलेली कामे होऊ लागतील.

9. धनु राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला लाल चंदनाने स्नान घालावी. यामुळे त्यांच्या मांगलिक दोषात खूप शांतता येईल.

10. मकर राशीच्या लोकांनी चांदीच्या भांड्यात प्रसाद टाकून आणि तुळशीची पाने टाकून भगवान श्रीकृष्णाला भोग अर्पण करावेत.

11. कुंभ राशीच्या लोकांनी एका भांड्यात माखन मिश्री ठेवून त्यावर तुळशीची पाने टाकून भगवान श्रीकृष्णाला भोग अर्पण करावा. याद्वारे देव त्यांचे सर्व दुःख दूर करतो.

12. मीन राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यात पिवळा पत्का घालावा. त्यांच्या सर्व मनोकामना ही पूर्ण होतात आणि देवी लक्ष्मी त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद ठेवते.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer