रक्षाबंधन 2022 - Raksha Bandhan 2022 In Marathi

Author: योगिता पलोड |Updated Fri, 05 August 2022 10:59 AM IST

रक्षाबंधन हा हिंदूंचा लोकप्रिय आणि प्रमुख सण आहे, जो भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचे आणि पवित्र बंधनाचे प्रतीक आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. सर्व बंधुभगिनी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यामुळे रक्षाबंधनाची तयारी महिनाभर आधीच सुरू होते. सन 2022 मध्ये 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या सणाचे शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा पद्धती आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी.


रक्षाबंधन 2022: तिथी आणि प्रदोष मुहूर्त

दिनांक: 11 ऑगस्ट 2022

दिवस: गुरुवार

हिंदू महिना: श्रावण

प्रदोष मुहूर्त: 20:52:15 पासून 21:13:18

माहिती: वर दिलेला मुहूर्त नवी दिल्लीसाठी वैध आहे. तुम्हाला तुमच्या शहरानुसार या दिवसाचा शुभ मुहूर्त जाणून घ्यायचा असेल तर, तुम्ही येथे क्लिक करा.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

रक्षाबंधनाशी संबंधित पौराणिक कथा

एका आख्यायिकेनुसार, अलेक्झांडरच्या पत्नीने आपल्या शत्रू राजाच्या मनगटावर राखी बांधून पतीचे प्राण वाचवले. पंजाबचा महान राजा पुरुषोत्तम याने सिकंदरचा युद्धात पराभव केला त्यावेळची गोष्ट आहे. पतीचा जीव वाचवण्यासाठी सिकंदरच्या पत्नीने महाराज पुरुषोत्तम यांच्या मनगटावर राखी बांधून बहीण म्हणून पतीचा जीव मागितला होता.

दुसर्‍या दंतकथेनुसार, एकदा बहादूर शाहने चित्तोडवर हल्ला करण्याचा कट रचला परंतु, राणी कर्णावतीकडे लढाईत बहादूरशहाला तोंड देण्याइतके लष्करी सामर्थ्य नव्हते. त्यावेळी कर्णावती राणीने हुमायूनला राखी पाठवली आणि मदत मागितली. मुस्लिम शासक असून ही, त्या राखीचा सन्मान करताना हुमायूनने आपल्या बहिणीचे आणि तिच्या राज्याचे शत्रूंपासून संरक्षण केले.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

रक्षाबंधना ची श्री कृष्ण आणि द्रौपदीची कथा

ही कथा रक्षाबंधनाशी संबंधित सर्वात लोकप्रिय कथांपैकी एक आहे, ज्याचे वर्णन महाभारतात आढळते. एकदा जेव्हा श्रीकृष्णाने शिशुपालाला मारण्यासाठी सुदर्शन चक्राचा वापर केला तेव्हा त्यांचे बोट कापले गेले आणि त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. कृष्णाच्या बोटातून वाहणाऱ्या रक्तावर द्रौपदीची नजर पडताच द्रौपदीने विचार न करता आपल्या साडीचा पदर फाडून भगवान श्रीकृष्णाच्या बोटावर बांधला. त्या दिवशी श्रीकृष्णाने बहीण द्रौपदीला वचन दिले की, ते तिचे नेहमी रक्षण करतील. नंतर जेव्हा कौरवांनी द्रौपदीचे वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कृष्णाजींनी तिला अशी साडी दिली, ज्याचा अंत नव्हता. अशा प्रकारे श्रीकृष्णाने द्रौपदीचा अभिमान वाचवला.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

रक्षाबंधन आणि इंद्रदेवाची कथा

रक्षाबंधनाची ही कथा इंद्रदेवाशी संबंधित अशी कथा आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या दंतकथेनुसार, एकदा देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध चालू होते, ज्याला अंत नाही असे वाटत होते. या युद्धात दैत्य राजा बळीने इंद्र देवाचा अपमान केला ज्यामुळे इंद्र देवाच्या सन्मानाला धक्का बसला. या सर्व घटना पाहून देवराज इंद्राची पत्नी साची भगवान विष्णूंच्या आश्रयाला गेली. त्यावेळी श्री हरी विष्णूंनी सची ला एक रक्षासूत्र दिले आणि सांगितले की, हा धागा अत्यंत पवित्र आहे. असे मानले जाते की सावन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सची ने ते रक्षासूत्र इंद्रदेवांच्या मनगटावर बांधले होते. या रक्षासूत्राच्या प्रभावाने इंद्रदेव असुरांचा पराभव करून त्यांचा सन्मान परत मिळवण्यात यशस्वी झाला. या कथेवरून आपल्याला माहित आहे की, प्राचीन काळी स्त्रिया युद्धावर जाणाऱ्या पुरुषांच्या रक्षणासाठी रक्षासूत्र बांधत असत, त्यामुळे राखी हा सण फक्त भाऊ-बहिणीपुरता मर्यादित नाही.

देशातील विभिन्न राज्यांमध्ये रक्षाबंधन उत्सव

परंपरेनुसार, एकीकडे जिथे रेशम धागा भाऊ बहिणीच्या नात्याला मजबूत करते तसेच या दिवशी भाभी ला ही चुडा राखी बांधते यामुळे भाभी चे नाते ही स्नेहात बांधते. या व्यतिरिक्त, रक्षाबंधन च्या सणाला देवी देवतेची पूजा, पितृ पूजन, हवन धार्मिक अनुष्ठान ही केले जाते.

रक्षाबंधन हा सण आपल्या देशात वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे सर्व राज्यांमध्ये हा सण साजरा करण्याच्या पद्धतीत फरक आहे, अरुणाचल प्रदेशात रक्षाबंधन हा सण श्रावणी म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस खास असतो. यज्ञांचे आयोजन केले जाते. तसेच, राखी किंवा रक्षासूत्र पंडित बांधतात.

महाराष्ट्रात रक्षाबंधन ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी लोक समुद्र किंवा नदीजवळ जाऊन भगवान वरुणाचे दर्शन घेतात आणि त्यांना नारळ अर्पण करतात. भारतातील काही राज्यांमध्ये जसे की, ओरिसा, केरळ आणि तामिळनाडू, रक्षाबंधन हा अवनी अवित्तम म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील नारळी पौर्णिमेप्रमाणे, या दिवशी लोक नदी किंवा समुद्राच्या काठावर जाऊन प्रार्थना करतात आणि स्नान करून शुभ गीते गातात.

रक्षाबंधनाची पूजा विधी

रक्षाबंधन 2022 मध्ये बनत आहेत 3 शुभ योग

2022 चे रक्षाबंधन खूप खास असणार आहे कारण, या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि रवि योग हे तीन शुभ योग तयार होत आहेत. आयुष्मान योग 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3:32 वाजता राहील, त्यानंतर सौभाग्य योग सुरू होईल. ज्योतिषशास्त्रात, हे तीन योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात. या योगांमध्ये केलेल्या कामात यश लवकर मिळते असे म्हणतात.

रक्षाबंधन 2022 ला शुभ बनवण्यासाठी, राशीनुसार बांधा या रंगाची राखी

घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी रक्षाबंधन च्या दिवशी नक्की करा हे उपाय

सर्व प्रथम मोळीला गंगाजलाने पावन करा. त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तीन गाठी बांधा. वास्तुशास्त्रात हा उपाय सांगितला आहे, त्यानुसार असे मानले जाते की असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाहते आणि गरीबी आणि वाईट गोष्टींचा अंत होतो. तसेच, चोरी, दरोडा इत्यादी अनुचित घटनांचा धोका कमी होतो.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer