माघ पौर्णिमा 2023 - Magh Purnima 2023

लेखक: योगिता पलोड | Updated Tue, 31 Jan 2023 10:30 AM IST

सनातन धर्मात मग महिन्याचे विशेष महत्व आहे आणि याची सुरवात झालेली आहे. या महिन्यात पूजा-पाठ आणि दान चे खूप महत्व असते. याच्या व्यतिरिक्त, याची पौर्णिमा तिथी अधिक खास मानली जाते. मग महिन्याच्या अंतिम तिथीला मग पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा च्या नावाने जाणले जाते. तसे तर, प्रत्येक महिन्याची पौर्णिमा तिथी पूजा-पाठ च्या दृष्टिकोनाने खास मानली जाते परंतु, मग महिन्याच्या पौर्णिमेचे विशेष धार्मिक महत्व आहे. मग पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करणे खूप शुभ मानले जाते कारण, अशी मान्यता आहे की, या दिवशी श्री हरी विष्णू गंगाजल मध्ये निवास करतात आणि भक्तांना आपला आशीर्वाद देतात म्हणून, या दिवशी स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते. या सोबतच, या पौर्णिमेच्या दिवशी दान-पुण्य केल्याने व्यक्तीला महायज्ञाच्या समान लाभ मिळतो.


माघ महिन्याला आधी ‘माध’ महिना म्हणत असे. ‘माध’ चा अर्थ भगवान श्री कृष्णाच्या एका स्वरुपासोबत आहे. अ‍ॅस्ट्रोसेज च्या या विशेष ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला माघ पौर्णिमेची तारीख, महत्व आणि शुभ मुहूर्ताच्या बाबतीत सांगत आहोत. या व्यतिरिक्त, या दिवशी केले जाणारे विशेष प्रकारच्या उपायांच्या बाबतीत चर्चा करू.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

माघ पौर्णिमा 2023 तिथी आणि मुहूर्त

शास्त्रांच्या अनुसार, माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि व्रत चे विशेष महत्व आहे. हिंदू पंचांग च्या अनुसार, या वेळी माघ पौर्णिमा 05 फेब्रुवारी 2023, दिवस रविवारी साजरी केली जाईल. खास गोष्ट ही आहे की, या दिवशी रवि पुष्य नक्षत्राचा संयोग ही बनत आहे.

माघ पौर्णिमा तिथी प्रारंभ: 04 फेब्रुवारी, 2023 शनिवारी रात्री 09 वाजून 33 मिनिटांपासून

माघ पोरींमा तिथी समाप्त: 05 फेब्रुवारी, 2023 रविवारी रात्री 12 वाजून 01 मिनिटांपर्यंत

माघ पौर्णिमा 2023 सूर्योदय: 05 फेब्रुवारी सकाळी 07 वाजून 07 मिनिटे

माघ पौर्णिमा 2023 सूर्यास्त: संध्याकाळी 06 वाजून 03 वाजता

माघ पौर्णिमेचे महत्व

27 नक्षत्रांपैकी एक मघा नक्षत्र च्या नावाने माघ पौर्णिमेची उत्पत्ती झाली आहे. पौराणिक कथेच्या अनुसार, मान्यता आहे की माघ मध्ये देवता पृथ्वीवर येतात आणि मनुष्याचे रूप धारण करून पवित्र नदीमध्ये स्नान, दान आणि जप करतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी श्री हरी ची विधी-विधानाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शास्त्रांमध्ये लिहिलेल्या कथनाच्या अनुसार, जर माघ पौर्णिमेच्या दिवशी पुष्य नक्षत्र असेल तर, या तिथीचे महत्व बऱ्याच अंशी वाढते.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

माघ पौर्णिमा 2023 पूजा विधी

गंगा स्नानाचे महत्व

मान्यतेनुसार, माघ महिन्यात देवतांचा पृथ्वीवर वास असतो. या दिवशी भगवान विष्णू स्वतः गंगेच्या पाण्यात स्नान करतात, त्यामुळे या दिवशी गंगेत स्नान करण्याचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी गंगेच्या पाण्याच्या स्पर्शाने शरीर रोगांपासून मुक्त होते, असा ही समज आहे. मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि स्वर्गीय निवासस्थान प्राप्त करतो.

या वस्तूंचे केले पाहिजे दान

माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर ध्यान आणि जप केल्याने श्री हरी भगवान विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी दान करण्याचे खूप महत्त्व आहे. या दिवशी गाय, तीळ, गूळ आणि घोंगडी दान करणे शुभ मानले जाते. याशिवाय कपडे, गूळ, तूप, कापूस, लाडू, फळे, धान्य इत्यादी वस्तू ही दान करता येतात. या दिवशी दानधर्माव्यतिरिक्त भगवान सत्यनारायणाची कथा कुटुंबीयांसोबत ऐकावी.

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्टने करा दूर!

माघ पौर्णिमेच्या दिवशी करू नये ही कामे

माघ पौर्णिमा व्रत कथा

पौराणिक कथेनुसार, कांतिका नगरात धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. भीक मागून तो आपले जीवन जगत असे. ब्राह्मणाला मूलबाळ नव्हते. एके दिवशी भिक्षा मागताना लोकांनी ब्राह्मणाच्या बायकोला वांझ म्हणत टोमणा मारला आणि तिला भिक्षा देण्यास नकार दिला. या घटनेने ब्राह्मणाच्या पत्नीला खूप दुःख झाले. त्यानंतर कोणीतरी त्यांना 16 दिवस देवी कालीची पूजा करण्यास सांगितले. ब्राह्मण जोडप्याने 16 दिवस नियम पाळून पूजा केली. या जोडप्याच्या पूजेने प्रसन्न होऊन, देवी काली 16 व्या दिवशी प्रत्यक्ष प्रकट झाली आणि तिला गर्भधारणेचे वरदान दिले. यासोबतच देवी कालीने त्या ब्राह्मणाला प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी एक दिवा लावायला सांगितला आणि हळूहळू प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी एक दिवा वाढवायला सांगितला. यासोबतच पती-पत्नी दोघांना ही पौर्णिमेचे व्रत एकत्र ठेवण्यास सांगितले होते.

देवी काली यांनी सांगितल्याप्रमाणे, ब्राह्मण जोडप्याने पौर्णिमेच्या दिवशी दिवे लावायला सुरुवात केली आणि उपवास ठेवला. असे केल्याने ती ब्राह्मण गर्भवती झाली. काही काळानंतर ब्राह्मणाला मुलगा झाला. दोघांनी आपल्या मुलाचे नाव देवदास ठेवले. पण देवदास अल्पायुषी होता. देवदास मोठा झाल्यावर त्याला काशीला त्याच्या मामाकडे शिकायला पाठवले. काशी येथे दुर्घटनावश धोक्याने त्याचा विवाह झाला. काही काळानंतर काल त्याचा प्राण घेण्यासाठी आला, पण त्या दिवशी पौर्णिमा होती आणि ब्राह्मण जोडप्याने आपल्या मुलासाठी उपवास ठेवला होता. त्यामुळे काल ब्राह्मणाच्या मुलाचे नुकसान करू शकला नाही आणि त्याच्या मुलाला जीवन मिळाले. अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्याने भक्तांना सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

माघ पौर्णिमा 2023 ला करा हे उपाय

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा: अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer